
श्रीरामपूर – कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “- राजेंद्र गायकवाड – याज कडून – अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील शिरसाठ यांनी शासनाच्या विविध योजना गावात राबवून सर्व नागरिक समस्या मुक्त करणार अशी ग्वाही सरपंच शिरसाठ यांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले याकामी उपसरपंच प्रेमचंद कुकलोळ ,सर्व ग्रामपंचायत सदस्य नेहमी एक दिलाने आपणास सहकार्य करत असतात त्यामुळे काम करण्यात आनंद वाटतो तर गावात विविध योजना राबवून ग्रामस्थांना दिलासा देणारे सरपंच त्यांच्या नावातच सु – निल असल्याने गाव समस्यांन पासून निल होणारच यात शंका नाही असे पोलीस पाटील यांनी यावेळी सांगितले . दत्तनगर गावात आरोग्यदायी योजना राबविण्यात आली तर माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या शासनाच्या उपक्रमातील योजनेत गावातील जनतेची कोविड तपासणी उपाय व योजना याबत सरपंच,उपसरपंच, ग्रामसेवक आदींनी मार्गदर्शन केले.आरोग्य सेविका,आशा सेविका , ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी मेहनत घेतली .
