अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा मिळायलाच हवा _ डॉ.एस.के.पाटील

0
32

 

मालेगाव: क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “_ प्रतिनिधी_
अहिराणी खान्देश व कसमादेची अस्मिता असुन लाखोंच्या तोंडावरची गोड बोली आहे. देशातच नव्हे तर परदेशातही तीचा गोडवा कायम आहे.अहिराणीला सरकारने प्रमाण भाषेचा दर्जा देऊन खान्देशचा सन्मान करावा असे उद्गार अहिराणी साहित्यिक डॉ. एस. के. पाटील यांनी काढले.
येथील राष्ट्र सेवा दलातर्फे कवयित्री बहिणाबाई यांच्या स्मृती दिनानिमित्त गुरूवारी सेवा दल सभागृहात अहिराणी कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पाटील बोलत होते.यावेळी साथी सुनील वडगे,राज्य सचिव नचिकेत कोळपकर, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंखे, तालुका संघटक सारंग पाठक, जिल्हा संघटक रविराज सोनार उपस्थित होते. बहिणाबाईंच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.डॉ पाटील म्हणाले, की सातवाहन राजांची ही भाषा. दोन हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी परंपरा असलेली भाषा आहे. तिला प्रमाण भाषेचा दर्जा मिळायला हवा त्यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत. राष्ट्र सेवा दल आमच्या सोबत आहे. डॉ गणेश देवीचे योगदान या साठी मोठे आहे.
प्रास्ताविकात स्थानिक बोली भाषांना उठाव व महत्व प्राप्त करून देऊन माणूस जोडण्याचा राष्ट्र सेवा दलाचा उद्देश नचिकेत कोळपकर यांनी सांगितला. कवी संमेलनात भिला महाजन,देवदत्त बोरसे,नाना महाजन,शैलेश चव्हाण,विवेक पाटील, आबा आहेर,शिवदास निकम,कैलास भामरे,समाधान भामरे,भरत पाटील,सतिष कलंत्री यांनी अहिराणी कवीता सादर केल्या. अहिराणीतुन राजेंद्र दिघे यांनी सुत्रसंचालन केले.आभार सारंग पाठक यांनी मानले. यावेळी रमेश उचित, नाना शेवाळे, रेखा उगले,अशोक फराटे, अशोक पठाडे यांच्यासह अहिराणी साहित्य प्रेमी व रसिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here