भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत , महानगर पालिका यांच्या निवडणुका घोषित झाल्या.इच्छुक उमेदवारांनी आपली बातमी , मुलाखत , जाहिरात आपल्या मतदार संघातील गटात , गणातील मतदारांच्या घराघरात आणि घरातील प्रत्येकाच्या मनामनात पोहोचण्यासाठी बिनधास्त संपर्क करा. संपर्क : ९१५८४१७१३१
मुंबई : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या पासून अनेक उतावीळ इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून रिंगणात उतरण्याची संधीची वाट पाहत आहेत. ह्या संधीची प्रतिक्षा आज संपणार असून इच्छांना लवकरच रिंगणात उतरण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासूनची प्रतिक्षा आज संपून निवडणूक रिंगणात उतरून आपले नशीब आजमावत येणार आहे.
राज्यात आज आचार संहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने नुकतेच एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून आज सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात येणार असून पत्रकार परिषदेत अधिकृत आचार संहिता आयोग घोषित करणार असल्याचे सांगितले जाते.त्यामुळे पत्रकार परिषद झाल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता आचार संहिता लागू होणार की नाही ? याबाबत शक्यता वर्तवली जात आहे.





