भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक. सुटणार नाही एकही खबर ! आहे आमची महाराष्ट्रभर नजर !! आपल्या परिसरातील बातम्या , राजकीय आणि अन्य घडामोडी तसेच जाहिराती साठी संपर्क करा . संपर्क : ९१५८४१७१३१
मुंबई कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे सरकार कडून नुकतेच संकेत मिळताच राज्यभर राजकीय घडामोडींना उकळ फुटला असून काही जिल्ह्यात उतू पण जात आहे. तर नाशिक जिल्ह्यात अनेक मंत्री महोदयांसह राजकीय जबाबदार प्रमुख नेत्यांनी अतिजलद स्पीड पकडत आपल्याच हाती स्थानिक स्वराज्य संस्थेची शिदोरी पाहिजे असा ठेका पकडत कार्यकर्ते , पदाधिकारी यांच्या बैठका घेत कान गोष्टी नेते मंडळी देऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आणि कान गोष्टी प्रमाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ज्या त्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते ठेका पकडणार आणि त्या पद्धतीने हालचालींना उकळ फुटल्याचे चित्र दिसत आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, बलावा बलावा … भाऊबंदले बलावा… असा ठेका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना , राज ठाकरे (मनसे) या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पकडल्याने असे झालेच तर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच बहर येऊन ठाकरे बंधूंच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यात नवचैतन्य निर्माण होणार यात शंका नाही. त्यामुळे ” बलावा बलावा …. भाऊबंदकीले….” या गीता प्रमाणे कार्यकर्त्यात उत्साह संचारला असून ठेका पकडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहेत . .कारण ठाकरे बंधूंच्या युती होण्याच्या शक्यतेला बळ मिळाल्याचे संकेत मिळाले असल्याचे बोलले जात आहे . शिवसेना उपनेते डॉ. अद्वय आबा हिरे–पाटील यांनी ‘ मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांची शिवसेना उपनेत्यांसह भेट घेऊन मनसेसोबत युती करण्याचा ठोस प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर मा. उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला असून, या युतीबाबत आतून हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
या संभाव्य युतीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. शिवसेना व मनसे ही दोन्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपणारी आणि मराठी अस्मितेसाठी लढणारी राजकीय शक्ती आहेत. या दोन पक्षांची युती झाली तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि संभाजीनगर यांसारख्या शहरी भागांत मराठी मतदारांमध्ये या युतीला प्रचंड पाठिंबा मिळू शकतो.
ही युती फक्त निवडणूकपूर्व रणनीती न राहता, मराठी जनतेच्या हितासाठी एकजूट होण्याचा ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो. दोन्ही पक्षांकडे सक्षम नेतृत्व, अनुभवी कार्यकर्ते आणि जनतेशी नाळ जोडलेली राजकीय भूमिका आहे. त्यामुळे ही युती केवळ मतांची बेरीज न राहता, ती मराठी माणसाच्या मनांची बेरीज ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
राजकीय विश्लेषकांचंही म्हणणं आहे की, जर शिवसेना आणि मनसे एकत्र आले, तर येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या युतीचा प्रभावी परिणाम दिसून येईल. विशेषतः सत्ताधाऱ्यांना कडवे आव्हान देण्याची ताकद या युतीत असणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरु होण्याच्या उंबरठ्यावर आपण उभे असल्याचं चित्र या घडामोडींमधून दिसत आहे.

