भाजपा प्रवेशा बाबत अशोक चव्हाण आणि इतरांच्या इनकमिंग बद्दल चर्चेला उधाण

0
57

भारत पवार : मुख्य संपादक                           पत्रकार नियुक्ती साठी तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क :मो. ९१५८४१७१३१                                                       राजकारण विशेष –  कटा. महाराष्ट्र न्यूज :  वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : भाजपात होत असलेल्या अशोक चव्हाण आणि इतरांच्या इनकमिंग बद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे
ह्याच विषयावर सुजित भोगले यांचे पटणारे मत
“चक्रवर्ती राजा अश्वमेध यज्ञ आणि लोकशाही व्यवस्था”
या त्यांच्या लेखाचा हा सारांश
जुन्या काळात चक्रवर्ती राजा होण्याचे स्वप्न बघणारा राज्यकर्ता अश्वमेध यज्ञ आयोजित करत असे. मग त्याचा अश्वमेधाचा घोडा अडवून त्या राजाशी लढून त्याला पराभूत करणे किंवा त्याचे मांडलिकत्व पत्करणे इतके दोनच पर्याय अन्य राजांच्या समोर असत.या पद्धतीने तो आपले बळ वाढवत नेई मग अश्याच एखाद्या मोठ्या चक्रवर्ती राजाला आव्हान देऊन त्याला पराभूत केले जाई.
आता शरण येणाऱ्या राजांना काही बाबीत अभय प्रदान केले जाई.त्यांच्या काही चुकांकडे दोषांकडे दुर्लक्ष केले जाई कारण अंतिम हेतू त्यांच्या शक्तीचा वापर करत चक्रवर्ती राजा होणे आणि स्वधर्म स्थापना करणे हा असे. राजेशाही संपून लोकशाही आली असली तरीही राजनीतीचे नियम बदलत नसतात.
हे सामान्य लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे.
सरळ मैदानात लढणारा राजा अश्वमेधाचा घोडा सोडून अन्य राजांना शरण आणतो.परंतु कुवत नसणारा राजा शेजारील राज्ये आतून खिळखिळी करत स्वतःची शक्ती दृढ करतो,स्वतःच्या अराजकाविरुद्ध बंड उभे रहाणार नाही याची काळजी घेतो.
२०२४ ची लोकसभा निवडणुकीतील संघर्ष हा त्या पातळीवर पोचलेला आहे. कॉंग्रेस हा पक्ष किंवा विचार नसून कोन्ग्रेस ही एक प्रवृत्ती आहे.कोन्ग्रेस हा ब्रिटीशांचा मुखवटा होता.
हा मुखवटा वापरत ब्रिटीश राज्य करत होते आणि आपले सामान्य नागरिक मात्र कोन्ग्रेस ब्रिटिशांशी लढते आहे या भ्रमात होते.
सावरकर आणि प्रत्येक क्रांतिकारकाचे लचके तोडणारी ब्रिटीश राजवट कोन्ग्रेसी नेत्यांच्या प्रती अत्यंत मऊ होती याचे कारण कॉंग्रेस ब्रिटीश एजंट होती हेच होते.कोन्ग्रेस होती म्हणून १८५७ नंतर ब्रिटिशांना या देशात रक्तरंजित संघर्ष करायच वेळ आली नाही. ज्या वेळेस ती परिस्थिती उद्भवते आहे वाटले ब्रिटिशांनी कॉंग्रेस च्या मदतीने देशाचे तुकडे केले. तरीही दुसऱ्या महायुद्धामुळे जर्जर झालेल्या ब्रिटिशांना आझाद हिंद फौज आणि नाविक संपामुळे राज्य करणे अशक्य होऊन बसले त्यावेळी त्यांनी देश सोडला. सोडताना सुद्धा जितक्या पाचरी मारता येतील तितक्या मारूनच ते इथून गेले.कॉंग्रेसच्या हातात सत्ता आली. पण सतत एजंट म्हणून काम केलेला माणूस कंपनीचा मालक झाल्यावर ज्या पध्दतीने काम करेल त्या पद्धतीने कॉंग्रेस ने कारभार सुरु केला.कॉंग्रेस ने आपली शक्ती आणि आपली अनियंत्रित सत्ता संपते आहे असा संशय आल्यावर प्रत्येक वेळेस ब्रिटीशांच्या पद्धतीने आपल्याच देशात फुटीरतावाद पेरत,पोसत आपली खुर्ची राखण्यात धन्यता बाळगली आहे.बांगलादेश निर्माण होण्यात कॉंग्रेसचा वाटा फारसा नाही पण त्यावेळी घुसलेली जनता कॉंग्रेस ने देशाबाहेर कधीच काढली नाही कारण हे जिवंत बॉम्ब कॉंग्रेसला आपली राजवट स्थिर करायला कायमच हवे होते.
जो गोष्ट बांगलादेशी मुस्लिमांची तीच गोष्ट नक्षलींची यांना जाणीवपूर्वक पोसले आहे दुर्लक्ष करत वाढू दिले आहेत. हे भविष्यातील बॉम्ब आहेत. याच पद्धतीने रोहिंग्या घुसवले आहेत… खलिस्तान चे भुत कॉंग्रेसनेच उभे केले होते.
आज आप त्याला खतपाणी घालत आहे. आपल्या देशात या क्षणी, या देशावर आणि हिंदू धर्मावर शून्य प्रेम असणारे आणि थोडेफार पैसे मिळाले तर कत्तल सुरु करू शकणारे कमीतकमी ७-८ कोटी बेकायदेशीर रित्या घुसलेले शरणार्थी मुसलमान आहेत. आपल्या देशात याक्षणी, कमीत कमी १-२ लाख आदिवासी नक्षली म्हणून रक्तपात घडवायला सुसज्ज आहेत. या सर्वांना लागणारी आर्थिक ताकद द्यायला चर्चेस आणि मशिदी सुसज्ज आहेत.
आणि अश्या दारूच्या कोठारावर बसून आपण लोकशाही नावाची बिडी फुंकत नैतिकतेचे ज्ञान xxx आहोत…
राहुल गांधी काढत असलेली यात्रा हे उघड उघड देशाचे तुकडे करण्यास प्रोत्साहन देणारी यात्रा आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्याची पावले,त्याचे वर्तन तसेच सुरु आहे.या सगळ्याचा तुम्हाला राजकीय पद्धतीनेच प्रतिवाद करावा लागतो.
चुकूनही त्याला अटक करणे किंवा यात्रेला प्रतिरोध करणे म्हणजे त्याला भावनात्मक आवाहन करण्याची संधी देणे आहे.
कॉंग्रेस चा खेळ स्पष्ट आहे.
राहुल गांधी परदेशात जाऊन भारताबद्दल जे बोलतोय ते त्याला इथे घडवायचे आहे.उद्या इथल्या रोहीन्ग्यांनी दंगली पेटवल्या तर ते रोहिंग्या आहेत का स्थानिक मुस्लीम हे कुणाला आणि कसे कळणार आहे ?
यात प्राणहानी झाली की भारतात हिंदू लोक दंगली करून मुस्लिमांचा वंशसंहार करणार आहेत हे मी म्हणत होतो तसेच घडते आहे म्हणून बोंबलायला राहुल गांधी मोकळा…
हे सगळे घडू द्यायचे नसेल तर काय करता येईल ?
राहुल गांधी ला अटक करा.
पण याचा परिणाम त्याला सहानुभूती मिळणे
आणि तो निवडणूक जिंकणे यात होऊ शकतो..
निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर हाकलू पण शकत नाहीत..
त्याचा पण विरुद्ध प्रचार होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचे तथ्य अजूनही कॉंग्रेस या पक्षाचा स्वतःचा जनाधार२५ % नक्की आहे.
भाजपाचा प्रत्येक विजय हा ३-४ % टक्क्यांच्या vote swing ने झालेला आहे.जर मागच्या दाराने घुसवलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदार झाले असतील तर त्यांची आणि अन्य मते मिळून आणि ईंडी आघाडी मजबूत झाली तर हा swing उलट फिरवणे अशक्य नाही…
मग या सगळ्यात एकच मार्ग शिल्लक उरतो..
तो म्हणजे उदार मतवादी हिंदू असणारे आणि जनाधार असणारे काँग्रेसी नेते फोडून त्यांना आपल्या पक्षात घेणे.
ते भ्रष्ट असतील का ?
निश्चित असतील,
कॉंग्रेस मध्ये कोरडा व्यक्ती मोठा होऊच शकत नाही. त्याने पैसे खाल्लेच पाहिजेत आणि त्याचा हिस्सा वरती दिलाच पाहिजे.
पण ते जर आपल्याकडे ओढले तर काय फायदा होईल ?
देशभर स्थानिक पातळीवर काही कांड करण्याचे स्वप्न कॉंग्रेस बघत असेल तर ते या नेत्यांच्या मार्फत करणार.मग हे नेतेच आपल्याकडे आले तर कोणतेही षडयंत्र यशस्वी होण्यासाठी लागणारा resource मिळणार नाही.
सध्या केली जाणारी incoming या साठी सुरु आहे
केवळ आणि केवळ यासाठी सुरु आहे.
हिंदू राष्ट्राचा अश्वमेध यशस्वी व्हायचा असेल
ब्रिटीश एजंट असलेल्या कॉंग्रेसला संपवायचे असेल तर शरण येणाऱ्या प्रत्येक राजाला आपल्याला त्याच्या गुणदोषांच्यासकट स्वीकारावे लागणार आहे. याला पर्याय नाही.घराणेशाही वाले गावठी सोरोस प्रत्येक राज्यात आहेत,केंद्रातील सोरोस राजमाता आहे आणि वरून यांच्या जोडीला पैसे ओतणारा आंतरराष्ट्रीय सोरोस तर आहेच आहे.इतक्या सगळ्यांनी ओतलेल्या पैशांच्या बळावर या देशात काहीही कांड घडवता येऊ शकते हे लक्षात घ्या.. आपला संपूर्ण मिडिया त्यांचा बटिक आहे हे लक्षात घ्या. हाच मिडिया कोणतीही बातमी आणि कोणतेही narrative क्षणात देशभर पसरवू शकतो हे लक्षात घ्या.
या प्रत्येकाला वेसण घालणारे कायदे आपल्याकडे अस्तित्वात नाहीत हे लक्षात घ्या.
त्यामुळे या तडजोडी अपरिहार्य आहेत.एकनाथ शिंदे,अजित दादा आणि नवरत्ने,अशोक चव्हाण, विश्वजित कदम, अमित देशमुख हे आणि असे अनेक नेते भ्रष्ट असतील पण ते राष्ट्रद्रोही नाहीत आणि आपापल्या सोरोसचे ऐकून ते कांड घडवणार नाहीत किंबहुना ते कांड घडवण्यात रस बाळगून नाहीत याची खात्री करून त्यांना घेतले जात आहे हे समजून घ्या. जो माणूस काश्मीर मुक्त करतो. राम मंदिर बनवतो. जो माणूस मदिनेत हिंदू स्त्री सन्मानाने फिरू शकेल अशी परिस्थिती निर्माण करतो. जो माणूस अरबी राष्ट्रात हिंदू मंदिरे उभी करतो त्याच्यावर शंका घेऊ नका.
फुकाची नैतिकता तुम्हाला उध्वस्त करते. परिस्थितीनुरूप आपल्याला लवचिक व्हावे लागते.
श्रीकृष्ण सुद्धा वेळ आल्यावर रणछोडदास होतो हे समजून घ्या…
बघा शांतपणे विचार करा…
सुजीत भोगले✍️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here