भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या , जाहिराती साठी संपर्क करा . संपर्क : ९१५८४१७१३१. पुणे : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : सध्या महाराष्ट्रात पाऊसाने हैदोस घातला असून दि.२८ व २९ सप्टेंबर या दोन दिवसात पाऊस संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व्यापनार असून जोरदार अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक , नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर , सांगली सातारा ,पुणे ,मुंबई ह्या जिल्ह्यात पाऊसाची अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ह्या जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही डख यांनी आपल्या अंदाजात सांगितले.
सगळ्यांसाठी दिलासादायक सगळ्यांसाठी दिलासादायक म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पासून पाऊस कमी होणार असून पाऊस परतण्यास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.





