जांगडगुत्ता नाशिक पालकमंत्री पदाचा ! जिल्ह्यात नाराजीचे सावट

0
16
Oplus_0

भारतराज  पवार : राज्य मुख्यसंपादक.                      आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१                                            नाशिक : कटा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क  : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लग्न सोहळ्या निमित्ताने दोन दिवस मुक्कामी नुकतेच नाशकात आले होते. यावेळी अनेकविध कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. अमृताचे थेंब पडले त्यामुळेच गोदाकाठी कुंभमेळा भरतो असे साधू महंतांनी सांगितले.  यावेळी १३ आखाड्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकेश्वर – नाशिक कुंभपर्वाच्या तारखा जाहीर केल्या. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंहस्थ प्रारंभ होणार असून २४ जुलै २०२८ रोजी दु. ३ : ३६ मी. सिंहस्थ समाप्त होणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे ,  अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित होते. पुणे येथील कार्यक्रमामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तर नुकतेच मंत्री पदी नियुक्ती झालेले छगन भुजबळ परदेशात असल्या कारणाने दोघ मंत्री मात्र यावेळी उपस्थित राहू शकले नाही.

यावेळी नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी छेडले असता पालकमत्री आणि अमृतस्नानाचा काहीच संबंध नाही. असे सांगत आपण टेन्शन घेऊ नका असे फडणवीस यांनी म्हटले. तर सध्यातरी गिरीशभाऊ कुंभ मंत्री आहेत समवेत जिल्ह्यात मंत्री दादा भुसे , छगन भुजबळ , नरहरी झिरवाळ हे अनुभवी मंत्री आहेत. आणि प्रसंगी आम्ही सुद्धा आहोत. असे सांगत पालकमंत्री पदाचा प्रश्न न सोडवता उलट पालकमंत्री पदाचा हा जांगडगुत्ता अधिकच गुंतागुंतीचा होत असल्याने जिल्ह्यातील नेते आणि राजकीय पदाधिकारी यांच्यात मात्र नाराजीचे सावट पसरले .

नाशिक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री पद मिळत नाही कधी नव्हे एवढा जांगडगुत्ता सध्याच्या सरकारच्या राजवटीत झाल्याने अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. येऊ घातलेला कुंभ मेळा आणि त्यानिमित्ताने जिल्ह्याला होणारी विकास कामे आणि त्या विकास कामांना येणारी विकासाची भरपूर शिदोरी ( निधी )  याचे नियोजन योग्य प्रमाणात होऊन खर्ची करावी लागणार.यासाठी जर स्वतंत्र पालकमंत्री पदाचा जांगडगुत्ता वेळीच सोडवला गेला तर अधिक सोईचे होईल असे ही मत अनेक जाणकारांनी यावेळी व्यक्त केले. मुख्यमंत्री आले पण हा जांगडगुत्ता न सोडविता तो तसाच सोबत घेऊन गेले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली होती की , पालकमंत्री बाबत मुख्यमंत्री योग्य भूमिका घेऊन हा प्रश्न याबाबत असलेला जांगडगुत्ता नक्कीच सोडविणार असे  अनेकांना वाटत होते.परंतु तसे काहीच झाले नसल्याने जिल्ह्यात नाराजीचे सावट पसरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here