!! आवाज जनतेचा , शासनापर्यंत !! भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक
देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : बरोबर एक महिना आणि चार दिवसांपूर्वी देवळा पोलिसांची इज्जत आणि त्यांच्या अब्रूचे धिंडवडे देवळा येथे त्यावेळी कार्यरत असलेला जगताप नामक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक यानेच उडवले होते. त्यामुळे देवळा पोलिसांचा प्रामाणिक पणा जनतेस निदर्शनास आला.पगार ( पेमेंट )असूनही लाचे साठी आपली उघडी पाडणे आणि …घालून घेणे वरून सर्वसामान्य व्यक्तीस धमकावणे यालाच का म्हणतात पोलीस पॉलिसी ? आपण शपथ घेतलेली असते त्या प्रमाणे प्रामाणिक राहून कशाचीही लालसा न बाळगता जनतेच्या रक्षणासाठी अविरत प्रयत्न करत राहणे आणि जनतेत विश्वासाचे नाते निर्माण करणे. हिच खरी पोलीस ईमानदारी . एवढे लिहिण्याचे एकमेव कारण म्हणजे गेल्या महिन्यात जगताप याने केलेला जीवापाड खटाटोप.आणि त्यामुळे पोलिसांची होती तेवढी धुळीस मिळवली हे सगळे जगजाहीर आहे. त्याच वेळी ” पोलीस तसे चांगले पण त्यांच्या इज्जतिचे खोबरे अधिकाऱ्यानेच वेशीला टांगले….. देवळा पोलीस दलातील ” लाच ” मागण्याचा नंगानाच वाढला , लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ” दोन लाखा रू.चा मासा अलगत जाळ्यात ओढला.” ह्या मथळ्याखाली बातमी महाराष्ट्र न्यूज मधून ऑनलाईन दिली होती. त्यात देवळा तालुक्यातील अवैध चालणाऱ्या धंद्यां विषयी सुद्धा वाचा फोडण्यात आली होती. त्या बातमीचा सर्वत्र गाजावाजा झाला होता आणि त्या बातमीची दखल वरिष्ठ जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घेऊन देवळा येथील तत्कालीन पोलीस निरीक्षक जाधव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.आणि त्यांचे जागी नव्याने सार्थक नेहते यांची पोलीस निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. वाटले तालुक्यातील बेकायदेशीर , काळे धंदे आता मातीमोल होतील परंतु एक महिना आणि काही दिवस होत नाही तोच अहिरे यांना देवळा येथे अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी उपोषणास बसावे लागले. हिच का ईमानदारी ! अवैध धंदे का होतेय पोलिसांचे अवघड जागेवरच दुखणं ? आपली ईमानदारी गुंडाळून असलेल्या इज्जतीस बट्टा लावण्याचा कार्यक्रम पोलीस का करून घेतात ? बट्टा लावणे त्यालाच पोलीस म्हणतात का ? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले. जनतेत आणि उच्च पदस्थ अधिकारी यांच्यात ह्या लाऊन घेतलेल्या बट्टा विषयी म्हणा किंवा लागलेल्या कलंका विषयी माहिती काय प्रतिक्रिया असू शकतात हे पोलिसांनी पारखने गरजेचे आहे.बातमी दिल्या नंतर माळवाडी गावातील धंदा बंद झाला.हे मात्र खरे परंतु तालुक्यातील बेकायदेशीर धंद्यांचा सुळसुळाट असल्या कारणाने अहिरे यांना उपोषण सारखे हत्यार उपसावे लागले. किती गेंड्याच्या कातडे पांघरलेले पोलीस म्हणावे लागेल. यावरून दिसते.
बातमी दिल्या नंतर पोलिसांनी तालुक्यातील धंद्यांकडे इमानदारीने लक्ष पुरून धंदे बंद केले असते तर पोलिसांची धूसर झालेली प्रतिमा उजळली असती. छाती अधिकच उंच झाली असती.पण नाही .आमच्या लालसा बोकाळलेली. आणि वेळ आली तर त्या लालसे पोटी संपूर्ण पोलीस दल मलिन करण्याचा हातखंडा सोडत नाही. असेच म्हणावे लागेल.आणि हे खरच आहे.अहिरे यांना अवैध धंद्यांना कायमचाआळा घालण्यासाठी उपोषणास बसावे लागणे.हे अवैध धंदे चालू ठेवण्याचे कारण काय ? मग पोलिसांच्या दृष्टीने हे धंदे ( बे)कायदेशीर की हप्तेशीर ? का दुर्लक्ष होते ? त्यांना असलेले लालच….!
उपोषण कर्त्यास म्हणे लेखी आश्वासन दिल्याचे समजले आणि लेखी दिल्याने उपोषण सोडले हे जरी खरे असले तरी लेखी आश्वासन आणि त्याचे पालन ईमान इतबारे किती महिने की कायमचे होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.तर पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी जागृत होऊन तालुक्यात अनेक बेकायदेशीर धंदे चालू आहेत जसे अनेक हॉटेल्स अशा आहेत की लायसेन्स नसतानाही त्या ठिकाणी मदिरा पिनाऱ्यांची तोबा गर्दी असते. बऱ्याच ठिकाणी दारू पण प्या आणि जेवणाचा आनंद लुटा अशा अनेक हॉटेल्स आहेत. त्यांची लायसेन्स तपासण्याची सुद्धा गरज आहे .यावर सुद्धा आपली करडी नजर ठेऊन आपले प्रयत्न सार्थकी लावावेत हिच खरी शान आणि ईमानदारी असणार.यात शंकाच नाही.येवढेच यानिमित्ताने. वेळ आली तर पुन्हा लिखाण करूच…. लेखन / शब्दांकन : भारतराज पवार , राज्य मुख्यसंपादक – ९१५८४१७१३१
