केंद्रीय अर्थसंल्प सादर काय स्वस्त आणि काय महाग होणार ? तर रेल्वे प्रवास होणार आता सुसाट …

0
62

आपल्या स्थानिक गावासह संपूर्ण महाराष्ट्रातील 54191+ वाचक संख्या असलेले प्रत्येक वाचकाच्या मनामनात आणि घराघरात पोहचलेले परखड, निर्भिड विचार सर्णीचे क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी तुमच्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करीता आजच संपर्क करा : संपर्क : भारत पवार : मुख्य संपादक :9158417131.                                        नवी दिल्ली : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच सादर केला यात कोणत्या वस्तू स्वस्त होणार ? आणि कोणत्या वस्तू महागणार ? हे त्यांनी आपल्या बजेट मध्ये सादर केले. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या परंतु जाणकारांचे म्हणणे आहे की, हा शिलकीचा अर्थसंकल्प आहे.संपूर्ण बजेट मध्ये नोकरदार वर्ग डोळ्यासमोर ठेवलेला नाही अर्थात नोकरदार वर्गास डावलून घोषणा केल्याचे मत जाणकारांनी यावेळी मांडले.                           स्वस्त होणार _ मोबाईल चार्जर , हिर्‍याचे दाग दागिने ,शूज , चप्पल तसेेच परदेशातून  येणाऱ्या मशिन्स ,मोबाईल ,कापड,लेदर हे मात्र स्वस्त होणार असल्याचे सांगितले तर                         महाग होणार _ कॅपिटल गुड्स वर आयात शुल्क मधील सूट काढून टाकत ७.५ टक्के आयात शुल्क आकारले. , इमिटेशन ज्वेलरी वरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आले आहे. जेने करून त्याची आयात कमी करता येणार ,परदेशी छत्री महगणार , एमएसएमईना मदत करण्यास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्टील स्क्रॅप वरील कस्टम ड्युटी वरील सूट एका वर्षासाठी वाढविण्याची घोषणा केली आहे.,मेंथा ऑइल वरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे.   रेल्वे प्रवास आता होणार सुसाट :येत्या तीन वर्षात ४०० ” वंदे भारत”एक्सप्रेस ट्रेन धावणार असल्याची घोषणा केली या वंदे भारत एक्सप्रेस द्वारे आणखी शहरे जोडण्याची अधिक शक्यता आहे.शिवाय देशात मेट्रो जाळे विस्तारनार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.तसेच 100pm गती शक्ती कार्गो टर्मिनल देखील पुढील तीन वर्षात विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा केली वंदे भारत एक्सप्रेस शहरी वाहतूक रेल्वेशी जोडली जाणार आणि लहान शेतकऱ्यांसाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाईल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत म्हटले की , कोरोणा महामारीच्या काळात अनेक भारतीयांना खूपच खडतर परिस्थितींचा त्रास सहन करून सामना करावा लागला आणि आपला भारत देश हा जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या एका अर्थ्यवस्थे पैकी एक आहे.या अर्थसंकल्पातून भारत पुढील पंचवीस वर्षांचा पाया रचणार असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here