September 21, 2023

मुंबईत घटस्पोटांचे कारण म्हणजे रस्त्यांवरील खड्डे , अमृता फडणवीस यांचा नवीनच जावई शोध ?

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : ९१५८४१७१३१.                                          मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी _ मुंबईतील प्रदेश भाजपच्या जैन विभागाच्या कर्करोग मुक्त महाराष्ट्र अभियान चे उद्घाटन विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.मुंबईतील खड्डे व वाहतूकोंडीमुळे अनेक जोडप्यांचे घटस्फोट होत असलयाची टीका अमृता फडणवीस यांनी यावेळी बोलतांना केली.त्यानंतर विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की,मी जेव्हा मुंबईतील समस्यांबाबत बोलते तेव्हा माझे मानसिक संतुलन बिघडण्याची टीका केली जाते मी देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आहे असे तुम्ही विसरून जा कारण मी दररोज सामान्य महिला प्रमाणे घराबाहेर पडते मलाही खड्डे आणि वाहतूक कोंडी मुळे त्रास होतो.मुंबईतील वाहतूक कोंडी मुळे सुमारे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट झाले आहेत वाहतूक कोंडीत अडकल्याने बराच वेळ वाया जातो पती _पत्नी आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचा दावा फडणवीस यांनी मुंबई मेट्रो मेस संकेतस्थळ आणि नेदरलँडच्या एका संस्थेने मुंबईतील वाहतूक कोंडी बाबत केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालांच्या आधारे केला. फडणवीस यांच्या वादग्रस्त विधानावर समाज माध्यमांवर प्रतिक्रिया उमटली असून हा नवीन जावई शोध असल्याची खोचक टीका महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली असून अमृता फडणवीस यांचा तर्क हास्यास्पद आहे, असल्याचे म्हटले आहे. तर मुंबईत अनेक समस्या असून मेट्रो चे काम पुढे गेलेले नाही तसेच एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुध्दा प्रलंबित आहे पण महविकास आघाडी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे असेही फडणवीस यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.