सावध : महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार , हवामान खात्याने केला ईशारा
1 min read
पनवेल : दि.१३, कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” – दीपक शिंदे – यांज कडून –

जिल्हाधिकारी रायगड अलिबाग, कार्यालयाला भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेला माहितीनुसार सावधनतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
दिनांक १३/१०/२०२० ते १७/१०/२०२० या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार तसेच अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविणार आलेली आहे.मनुष्यहानी व वित्तहानी टाळण्यासाठी किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्हय़ांना सतर्कतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आलेला आहे.तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याची सूचना केलेली आहे
*_जिल्हा नियंत्रण कक्ष_*
संपर्क क्रमांक ०२१४१२२२११८/८२७५१५२३६३