मशिदी वरील भोंग्यांचे संरक्षण आरपीआय करणार _ ना.रामदासजी आठवले

0
42

भारत पवार : मुख्य संपादक : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१

मुंबई : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : नेटवर्क : राज्यातील मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण आर.पी.आय.पक्षाचे पदाधिकारी करतील असे सूतोवाच केंद्रिय राज्यमंत्री व आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी केले.मुंबई येथील पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.त्यांनी मुस्लिम बांधवांनी शांतता ठेवावी कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करू नये.गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगा काढण्याचे वक्तव्य केले होते आणि पुन्हा ठाणे येथील सभेत त्यांनी ३ मे पर्यंत भोंगे उतरविण्याची मुदत दिली.याबाबत ना.आठवले यांनी सांगितले की आमचे आरपीआय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील भोंगे काढण्या साठी विरोध करतील.चिथावणी खोर वक्तव्ये शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत असले तरी मौलानानी समाजात शांतता ठेवावी असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले.दरम्यान ३ मे साठी काही दिवस बाकी असून १ मे रोजी औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे काय बोलणार , सभा होईल की नाही याची चर्चा जनतेत रंगली असून सभा झालीच तर राज ठाकरे काय राज व्यक्त करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.मात्र पोलिसांची मोठीच डोके दुखी वाढली असून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here