परखड, दमदार, निर्णायक महाराष्ट्रातील जनतेचे हक्काचे प्रत्येक घरा घरात व घरातील प्रत्येकाच्या मन पसंतीस उतरलेले निर्भिड फास्ट महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल साठी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क करा .तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा : संपर्क _ भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज , मो.9158417131
महाराष्ट्र न्यूज : भारत पवार , मालेगाव : _ नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगर पालिकेची घडी व्यवसथित नसते न बसते तेवढ्यात घडी विस्कटली जाते त्यामुळे मालेगाव वासियांमध्ये ” सैर भैर ” होण्याची वेळ येते त्यामुळे अनेक विकास कामांना आणि स्वच्छतेच्या कामास काही अंशी खिळ बसतो.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे कार्यरत असलेले आयुक्त भालचंद्र गोसावी यांंची निियुक्ती होऊन साधारणतः ५/६ महिन्यांचा कालावधी लोटलाा असेल त्याा कालावधीत अनेक घटनांना उत येऊन ओसांडल्या सुद्धा अशातच आयुक्त गोसावीी यांनी महापालिकेची घडी व्यवस्थित बसवून शुभकामना शुभारंभ केला होता. अशा स्थितीत मालेगाव महानगरात साथीच्या रोगांनी डोके वर काढल्याने जनता हैराण झाली आहे. कोरोना महामारी च्या कालावधीत संपूर्ण जनता परेशान असताना हळूहळू नागरिक सावरतात न सावरतात तोच साथीच्याा रोगांनी नागरिकांना हैरान करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः चिकनगुनिया या रोगाचे प्रमाण बालकांमध्येे आढळून आल्याचे बोलले जाते त्यामुळे अनेकांनी खाजगी दवाखान्यांचा आसरा घेतल्याचे दिसतेे तर थंडी ताप यांसारख्या रुग्ण खाजगी दवाखान्यात उपचार करताना आढळतात. या साथीच्या रोगांना जबाबदार म्हणजे मालेगावात असलेली अस्वच्छता असे ही म्हणता येईल काारन नियमित आणि वेळेवर सर्वच गटारी स्वच्छछ केल्या जात नाही तर झाडू कामगार महिला ह्या सुद्धा कुठे झाडू लागला कुठे नाहीी लागला अशा प्रकारे झाडूू मारुन मोकळ्या होतात कारण बऱ्याचशा महिला सकाळी दहा वाजल्यानंतर त्यांच्या घरी पण पोहोचतात हे कसे ? यासाठी संबंधित मुकादम , एस आय, यांनी आजवर झाडू कामगारांविषयी वेळेचे बंधन आणि कामाचे तास याविषयी का लक्ष घातले नसावेेे ? हा विचार करण्या सारखा प्रश्न आहे . जर पायबंद घातलाा असता किंवा वेळेच्या बंधना विषयी लक्ष घातले असते तर 10 वाजेनंतर झाडू कामगार घरी पोहोचले नसते आणि स्वच्छतेचा बोजवारा उडाला नसता. गांांांंं सद्या नव्यााने आलेले आयुक्त संजय दैने आय ए एस दर्जाचे अधिकारी असून त्यांचे येणे मालेगाव महानगरात निश्चित झाले असून जनतेच्या अपेक्षाा उंचावल्या आहेत .