बागलाण _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ अजय ठाकरे _
*बागलाण*:- नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात बागलाण पासून 20 किलोमीटर अंतरावरील गावं डांगसौंदाणे कडुन कनाशी कडे जाणाऱ्या रस्ता. किंवा कनाशी कडुन डांगसौंदाणे, कडे किंवा सटाणा, कळवण, नाशिक, जाण्यासाठी पुल लागतो. डांगसौदाणे गावापासुन अर्ध्या किलोमीटर अंतरावरील कानाशी जात आसतण नाल्यावर एक पुलावरती मध्यभागी ठिक- ठिकाणी खड्ड्या पडलेल्या आहे. म्हणून प्रवासी धोकेदायक ठरवू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्ष्यमय दुर्लक्ष. ठिक- ठिकाणी पडलेल्या खड्ड्या मुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. प्रवासी, वाहन चालक खड्ड्या टाळण्यासाठी किंवा खड्डे चुकवण्याच्या प्रयत्न वाहन चालक करत आसत. धुळीचे आणि खडी प्रमाण जास्त वाढत आहे. वाहनांची रहदरी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहन चालकंसह, नागरिकांना, व शेतकऱ्यांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागते. या रस्त्यावर वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडत असुन समोरून, कोणत्याही साईट ने वाहन येत ते समजात नाही . त्यामुळे सदर ठिकाणी केव्हाही अपघात घडु शकते. या अपघातांना जबाबदार कोण.? असा प्रशन वाहन चालक, व नागरिकांना पाडलं आहे. धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच या रस्त्यावरून मोठी वाहने जातात तेव्हा मोठ्या प्रमाणात धुळ उडत असुन काही वेळा साठी समोरचे वाहन दिसेनासे होत असते. वेळप्रसंगी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. आणि नाल्यांची दोन्ही बाजूला खाली मोठ्या-मोठी दरी आहे. म्हणून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.आणि कानाशी ते डांगसौदाणे या रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक गाव आहे. वड्याचे पाडे, मोठे साकोडे, करंजखेड या गाव च्या शेतकरी तेचं रस्त्याने शेतीमाल विक्रीसाठी, बाजाराला किंवा मार्कीटी सटाणा, कळवण, नाशिक ला घेऊन जात असत. म्हणून बांधकाम विभागाने तातडीने लक्ष्या देऊन. लवकरात- लवकर नविन रस्ता किंवा पुलावरचे खड्ड्या भरले (बूंजले) पाहिजे असे मागणी जनते कडून केली जात आहे.